राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर कृषी विभागाच्या नुकसानीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आर्थिक मदतची घोषणाही केली. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. आता राहिलेला २५ टक्के निधी देखील आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. तर सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
दोन-तीन दिवसांमध्ये ही रक्कम प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. यामुळे पुढील पिकासाठी याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यावेळी राज्य सरकारने लगेच मदतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्ष वाटपाकडे दुर्लक्ष झाले. दोन महिन्याने पहिल्या टप्प्यातील रक्कम ही दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाली. मात्र, घोषणेच्या 75 टक्केच रक्कम वितरीत करण्यात आली होती.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव 25 हजार कोंबड्या मारण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
केळीच्या दरात दीड वर्षातील विक्रमी वाढ
जुन्नर येथे उद्यापासून पर्यटन विभागाचा द्राक्ष महोत्सव
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अहवाल खुला कराव : कृषीमंत्र दादाजी भुसे
येत्या चार दिवसांमध्ये ही रक्कम जमा होताच वितरीत केली जाणार आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇













Users Today : 19
Users Last 30 days : 772
Users This Month : 97
Users This Year : 809
Total Users : 236258