गेल्या तीन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्याने रब्बीतील हरभरा पिकांचे उत्पादन विक्रमी वाढ होऊ लागली आहे. या हरभऱ्याची नाफेडकडून 5 हजार 230 रुपये या हमीभावाने खरेदी सुरू होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून नाफेडने राज्यातील सर्व खरेदी केंद्रे बंद केले आहेत. राज्यामध्ये चालू रब्बी हंगामात हरभऱ्याचे तब्बल 27 लाख 56 हजार टन उत्पादन झाले.
हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. खरेदी 29 मे रोजी बंद होणार होती परंतु कोणतीही सूचना न देता खरेदी बंद केल्याने शेतकरी त्याचबरोबर नाफेड हमीभाव खरेदी केंद्रातील संचालक यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली आहे.
आनंदाची बातमी : डाळिंबावरील खोडभुंगेऱ्यावर लवकरच नव्या शिफारशी
चालू रब्बी हंगामात हरभऱ्याचे तब्बल 27 लाख 56 हजार टन उत्पादन झाले असून, यापैकी नाफेडने अवघा ६ लाख ८० हजार टन हरभरा खरेदी केला. उर्वरित हरभरा शेतकऱ्यांकडे पडून आहे. हमीभावाने खरेदी केंद्रे बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना हरभरा स्थानिकच्या लोकल मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे.

महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. कारण या भागातील हवामान आणि कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याचे पीक उत्तम पद्धतीने घेता येते. त्यामुळे या भागातील शेतकरी हरभऱ्याच्या पिकाला पसंती देताना दिसत आहेत. कारण हरभऱ्याला नेहमी नाफेडच्या वतीने हमी भावाने खरेदी केली जाते. त्यामुळे हरभऱ्याच्या पिकाला अगोदरच भाव निश्चित असल्याने शेतकऱ्याला याचा फायदा होतो. यावर्षी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रामध्ये राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड केंद्राकडे नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही नोंदणी करत असताना नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांना 29 मे पर्यंत हरभऱ्याची खरेदी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा नाफेड हमीभाव खरेदी केंद्र संचालकांना कोणतीही नोटीस न देता अचानक पणे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड खरेदीची वेबसाईट पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि खरेदी थांबवण्यात आली आहे.
महत्त्वाची बातमी : गोदावरी प्रदूषित करण्याऱ्या कंपन्यांविरुद्ध होणार कारवाई
राज्यभरात नाफेडने अचानक दोन दिवसांपूर्वी हरभऱ्याची खरेदी बंद का केली, याचे कारण स्थानिक पातळीवर कुणीही शेतकऱ्यांना कुणीही देत नाही. मात्र, विविध शासकीय योजनांसाठी जेवढा हरभरा लागतो, तेवढाच खरेदी करण्याचे टार्गेट राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नाफेडला दिले असल्याचं सांगितले जात आहे. या टार्गेटनुसार राज्यभरातून 6 लाख 80 हजार टन हरभरा खरेदी करून राज्यातील खरेदी खरेदी केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात लूट सुरू आहे.

नाफेडकडून 5 हजार 230 रुपये या हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू होती. त्यामुळे शेतकरी खुश होते. मात्र, नाफेडने ही खरेदी बंद करताच खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव कोसळले आहेत. खुल्या बाजारात सध्या सरासरी 4 हजार 500 रुपये दराने हरभरा खरेदी केला जात आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तब्बल 700 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात 20.76 लाख टन हरभरा पडून आहे.
महत्त्वाची बातमी : अखेर दुधाच्या एफआरपीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नियुक्त
गेली सहा महिने जपलेल्या या हरभऱ्याच्या उत्पन्नाचा मोबदला हाती येणे अगोदरच सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. राज्य आणि केंद्र सरकारने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे आणि खरेदी विना शिल्लक राहिलेला सर्व हरभरा हा खरेदी करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे
नक्की वाचा : ऊसतोड मजूरांना महामंडळाच्या माध्यमातून न्याय देणार : मुंडे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1