सध्या बाजारात टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला आहे. यंदा हंगामाच्या सुरूवातील 30 किलो असणारे टोमॅटो अचानक आवक कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने मागच्या काही दिवसांपासून प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना लॉटरी लागलीय तर सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ न झाल्यास टोमॅटोचे दर शंभरी पर करण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर, पुणे, मुंबईतील घाऊक तसेच किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये किलो इतका झाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्याठिकाणी सध्या एक किलो टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मात्र ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनपूर्व पावसामुळे टोमॅटोची काढणी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.
मोठी बातमी : नाफेड हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी अचानकपणे थांबवली
दरम्यान, जास्त उष्णतेमुळं उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा टोमॅटो लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादनही घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा टोमॅटोची आवक कमी आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. तसेच उन्हामुळेही टोमॅटोची मागणी चांगली वाढली आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणी असते. पावभाजी, सॅलॅड आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. परंतू बाजारात पुरेसा पुरवठा नसल्याने टोमॅटोच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
आनंदाची बातमी : डाळिंबावरील खोडभुंगेऱ्यावर लवकरच नव्या शिफारशी
मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविले जात आहे. मागणी वाढली मात्र यंदाचं टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोचे दर कमालीचे वधारले आहेत. मागील वर्षांपूर्वी हाच टोमॅटो केवळ 5 ते 7 रुपये किलोंवर विकला गेला होता. काही शेतकऱ्यांनी उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सध्या टोमॅटोच्या दराने शंभरीपार केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. टोमॅटो स्टोअर करता येत नाही. त्यामुळे त्याची लगेच विक्री करावी लागते. त्यामुळे व्यापारांना त्यामध्ये फार काही करता येत नाही. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे मार्च महिन्यात लागवडी कमी झाल्या. 10 टक्के सुद्धा लागवडी झाल्या नाहीत. तसेच उन्हाळ्यामध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवडी कमी केल्या परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये जर टोमॅटो लावले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असा अंदाजी काही तज्ञ शेतकऱ्यांनी वर्तवला होता. ज्यांनी मार्चमध्ये लागवडी केल्या त्यांची टोमॅटो सध्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ न झाल्यास टोमॅटोचे दर शंभरी पर करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : गोदावरी प्रदूषित करण्याऱ्या कंपन्यांविरुद्ध होणार कारवाई

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1