राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या तीन दिवस मराठवाडा, विदर्भात दौरा करून राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीची पहाणी केली. त्यांनी या दौर्यात ठिकठिकाणी नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या या समस्या आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार असून, शेतकऱ्यांवरील हे संकट दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे मत व्यक्त केले.
आनंदाची बातमी : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह राज्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि ग्रामीण भाग पिंजून नुकसानीची पाहणी केली आहे. रविवारी ते मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करुन सोमवारी मुंबईत दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांवर जे संकट ओढावले आहे ते मदतीच्या माध्यमातून दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पंचनामेही नाहीत. प्रति हेक्टर 75 हजाराची मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी यापूर्वीच केली होती. विदर्भानंतर त्यांनी मराठवाड्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सध्याचे राजकारण आणि ग्राऊंडवरची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि तेही भरीव अशी केली तरच शेतकऱ्यांवरील संकट दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
लक्षवेधी बातमी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात बदल करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्या राज्याचा कारभार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच हाकत आहेत. ते कितीही कर्तबगार असले तरी आपले राज्य मोठे असल्याने ते शक्य नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करुन जबाबदारी पालकमंत्र्यांवर दिली तर अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्यात केवळ एकच समस्या आहे असे नाही. दिवसागणिस त्याचे स्वरुप बदलत नाही. मात्र, मुंबईत बसून लक्षात येणार नाही तर स्थानिक पातळीवर फिरुन, शेतकऱ्यांशी संवाद साधूनच त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे.
नव्या सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. याची जाणीव सरकारला असणे गरजेचे आहे. आता कुठे हालचालींना वेग आला असून दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.
अतिमहत्वाची बातमी : ई-पीक पाहणीचा नवीन ॲप उद्यापासून शेतकऱ्यांसाठी उलपब्ध

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1