मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी खरीप हंगामातील पिकांवरील धोका टळलेला नाही. मध्यंतरी सलग पंधरा दिवस संततधार पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सोबतीला शंखी गोगलगाय आणि पैसा (वाणी) सारखे पीक खाणाऱ्या कीटकांची त्यात भर पडली असून, वाढत्या प्रादुर्भावाने पिकेच फस्त होत आहेत. अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असले तरीही, गोगलगाय संदर्भात काय भूमिका घ्यावी याबाबत कृषी विभाग अजूनही संभ्रम अवस्थेत आहे. तर दुसरीकडे बाधित झालेल्या क्षेत्राचे आकडेवारी ही धडकी भरवणारी ठरत आहे.
मान्सून अपडेट : ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस
लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यात यावर्षी सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आषाढी एकादशीपासून पावसाने जी सुरवात केली, तो अजूनही थांबायला तयार नाही. दरम्यान पिकांवर गोगलगाय सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रत्येक शिवारात गोगलगायीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या गोगलगायीचा प्रादुर्भाव दर दिवशी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पैसा सारख्या आणखी एका कीटकाचा प्रादुर्भाव पिकांवर पाहायला मिळत असल्याने नवीन संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोयाबीन, कापूस, मूग या पिकांवर गोगलगायी ताव मारत आहेत. पिके कोवळी असतानाच गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ तर सोडाच पिकेच फस्त केली जात असल्याने खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडेल तरी कसे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड, लातूर, बीडनंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गोगलगायीची संख्या वाढत आहे. त्यामुळे पीक पाहणी करुन पंचनामे आणि त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
लक्षवेधी बातमी : शेतकऱ्यांवरील संकट दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : अजित पवार
केवळ मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी ही असतेच पण यंदा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने पेरणी झालेली पिके तब्बल 15 दिवस पाण्यात होती. पावसानेही उसंत घेतली तर आता पंचनामेही वेगात होऊ लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पीक पाहणीचा दौरा संपताच प्रशासकीय यंत्रणा हालली असून पंचनाम्याला सुरवात झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली आहे.

एकीकडे गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर सुरु असतांना दुसरीकडे, कृषी विभागाच्या ॲपमध्ये शंखी गोगलगायी आणि पैसा या किटकांचा उल्लेख कोणत्या सदरात करावा, याचे निर्देश प्राप्त झाले नसल्याने कृषी विभाग संभ्रम अवस्थेत आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कृषी विभागाने माहिती गोळा केली आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरून निर्देश येत नसल्याने ते सुद्धा हतबल झाले आहे.
आनंदाची बातमी : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1