राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळताच अब्दुल सत्तारांनी तात्काळ जालना येथे मराठवाडा विभागाची बैठक घेऊन आपल्या कामाला सुरवात केली. या बैकीत त्यांनी जुलै महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येक आठवड्यातील एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
ब्रेकिंग न्यूज : विरोधक करणार ओल्या दुष्काळाची प्रमुख मागणी
अब्दुल सत्तार यांनी बैठकीत कृषी विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस सर्व अधिकाऱ्यांसह शेताच्या बांधावर जाण्याचा निर्णयही यावेळी घेतला. तसेच त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

फायद्याच्या टिप्स : असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण
यावेळी संदर्भात बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी आणि माझ्या खात्याचे अधिकारी दर आठवड्यात एका गावात जाणार आहोत. त्या गावात गेल्यावर शेतकऱ्यासोबत एक दिवस घालवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या समस्या कळणार नाहीत. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याच सत्तार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या टिप्स : सिताफळवरील या तीन किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येची संख्या अधिक असल्याने आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्यावर ही वेळ का येत आहेत याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सत्तार यांनी यानेली सांगितले. शिवाय यावेळी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कशा आहेत, त्यातून शेतकरी काय पिकवत आहे. त्याने काय पिकवले पाहिजे ? या सर्व गोष्टीबाबत अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन यावर काही निर्णय घेता येतील का ? याचाही विचार केला जाणार असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या टिप्स : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1