नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा मांडण्याची केलेली घोषणा ताजी असतानाच जालन्यात शनिवारी धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून अंबड तालुक्यातील वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्यांने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
मोठी घोषणा : कोकणातील आंबा बागायतदारांना उद्योगमंत्र्यांचा दिलासा
शिंदे सरकारची स्थापना होताच महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य असणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, राज्यात आत्महत्येचे सत्र हे सुरुच असून, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर 24 दिवसात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे.

मराठवाड्यात नांदेड नंतर शनिवारी जालन्यात आत्महत्याची घटना घडली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून अंबड तालुक्यातील वडी काळ्या गावातील पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. संजय ढेबे (वय 45) व संगीता ढेबे (वय 40) आत्महत्या करणाऱ्या पती पतत्नीची नावे आहेत.
हे वाचा : संघटित लढ्याशिवाय ऊसतोड मजुरांना पर्याय नाही : डॉ. डी. एल. कराड
या शेतकरी दाम्पत्याकडे खासगी फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. फायनान्सचा व्याजदरही अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत होती. सध्याची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर याला त्रासून या दांम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नसलयाने अंबड पोलीस ठाण्यात मात्र आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
ब्रेकिंग : यंदा कापूस भाव खाणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1