संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी कृषी संशोधनाची माहिती त्या-त्या क्षेत्रीय भाषेमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर व्यवस्थापन संस्थांच्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
धक्कादायक : आत्महत्येचे सत्र सुरुच : जालन्यात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
देशातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी संशोधन महत्त्वाचे असल्याचे सांगून, गडकरी म्हणाले, संत्रा, सोयाबीन, कापूस यांच्या लागवडीसाठी योग्य मातीची निवड करणे गरजेचे असते. लागवड करण्यापूर्वी योग्य प्रकारचे बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. तसेच कीटकनाशक, पाणी यांचा वापर करुन योग्य तंत्रज्ञानाद्वारे संशोधनाचा उपयोग समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संशोधन संस्थामध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारताला कृषी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भर करण्यासाठी एनबीएसएलयुपी सारख्या संस्थांचे संशोधन महत्त्वाचे आहे. आपल्याला कृषीचा विकास दर हा 22 टक्क्यांवर आणायचा आहे. यासाठी हे संशोधन कामात येईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. कृषी संशोधनामध्ये केंद्र शासनाच्या कार्यरत असणाऱ्या संस्थांनी परस्पर संवाद तसेच सहकार्याच्या माध्यमातून सर्व हितधारकांना सोबत घेणे आवश्यक आहे.
मोठी घोषणा : कोकणातील आंबा बागायतदारांना उद्योगमंत्र्यांचा दिलासा
केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्थेने नागपूर शहर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नर्सरी सोबत जॉइंट व्हेंचर करून संत्र्याच्या कलमांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना कलम माफक दरात उपलब्ध होऊन संत्रा पिकाची उत्पादकता वाढेल, असे त्यांनी सुचवले. आपल्या देशामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस या क्षेत्रांमध्ये दर एकरी उत्पादन हे इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
हे वाचा : संघटित लढ्याशिवाय ऊसतोड मजुरांना पर्याय नाही : डॉ. डी. एल. कराड

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1