राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि. 1 सप्टेंबरपासून मेळघाटात करण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येणार आहे.
मोठी बातमी : महा-ऊस नोंदणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे बुधवार 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होणार आहे. यावेळी कृषीमंत्री हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे 1 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता ‘माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे शुभारंभ होणार आहे.
मोठी बातमी : परतीचा पाऊस आठवड्यात दाखल होणार !
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ आणि प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक आणि इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
महत्त्वाची बातमी : ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1