यंदा पडलेल्या अतिरिक्त व उशीरापर्यंतच्या पावसामुळे द्राक्ष बागांच्या व्यवस्थापनाचे गणित चुकत चालले असून, राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणाऱ्या द्राक्ष छाटण्या यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीतच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदा किमान दिड महिना उशीराने द्राक्ष बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाची बातमी : बुलडाण्यात सोमवारी ‘एल्गार मोर्चा’ : रविकांत तुपकर
महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षात मराठवड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यातही निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला सुरू झाली आहे. मात्र नाशिकचे द्राक्ष गुणवत्तापूर्ण असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते. त्याची चव देखील इतर देशांतील द्राक्षाच्या तुलनेत चांगली असल्याने नाशिकचे द्राक्ष जगात भारी म्हणून ओळखले जाते.

यंदा रेंगाळलेला पाऊस आणि लवकर पडलेली थंडी यामुळे नाशिकसह राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजूनही बऱ्याच शेतातून पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. दरवर्षी सप्टेंबर अखेर पर्यंत पाऊस हा थांबत असतो, त्यानंतर द्राक्ष बागेच्या छाटणीला सुरुवात होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसही उशिरा दाखल झाल्याने पाऊसही उशिरा उघडला आहे. त्यात आता ऑक्टोबर महिना उलटला नोव्हेंबर महिना सुरू झाला तेव्हा कुठे छाटणीला सुरुवात झाली आहे.
आनंदाची बातमी : रोपवाटिका योजनेच्या अनुदानात 48 हजाराची वाढ
यंदाच्यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने आणि उघडल्याने द्राक्ष बागेच्या फळधारणेसह उत्पादनावर परिणाम करणार आहे. नाशिकसह राज्यातून द्राक्षाची होणारी निर्यात यंदाच्या वर्षी लांबणार असून निर्यात धोरण बदलल्याने त्याचाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

साधारणपणे द्राक्षाची परिस्थिती पहिली तर सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस थांबतो आणि ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरवात होत असते. यंदाच्या वर्षी हे गणित महिन्याने लांबणीवर पडले आहे, ऐन थंडीत द्राक्षाची छाटणी यंदा होणार असून, द्राक्ष मण्यांच्या फुगणीवर याचा परिणाम होणार आहे. शिवाय यंदा पावसामुळे रोगराई पसरणार असल्याने औषध फवारणी अधिकची करावी लागणार आहे. परिणामी दक्ष उत्पादनाचा खर्च देखील वाढणार आहे. शिवाय द्राक्षाला मिळणारा भावही यंदाच्या वर्षी कमी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1