साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची वजन काट्यावर होणारी फसवणूक थांबवण्यासाठी साखर आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करता येणार आहे. विशेष म्हणजे हे वजन साखर कारखान्याला मान्य करावे लागणार आहे. त्यामुळे आता काटा मारणाऱ्या कारखान्यांना या निर्णयामुळे मोठा चाप बसणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करा : कृषिमंत्री
साखर कारखानदार उस उत्पादक शेतकऱ्यांची वजन काट्यावर मोठी फसवणूक करतात, असा आरोप अनेक दिवसापासून केला जात होता. या निर्णयामुळे ही समस्या निकाली निघणार आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्याच्या वैध मापन विभागाकडे याबाबत लेखी प्रस्ताव पाठवून विचारणा केली होती. त्यानुसार वैध मापन विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्ताला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी वजन काट्यावर मोजून कारखान्याकडे आणलेला ऊस साखर कारखान्यास स्वीकारणे बंधनकारक आहे. असा ऊस कोणत्याही साखर कारखान्यांना नाकारता येणार नाही.

या पत्राच्या आधारे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे याबाबत सर्व साखर कारखान्यांना तसा आदेश देणार आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उसाचे वजन मोजताना होणारी काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती.
महत्त्वाची बातमी : भारतातून यंदा 11 देशात होणार भरड धान्याची निर्यात
त्यामुळे आता राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांचे वजन काटे तपासण्याची मोहीम साखर आयुक्तालयाच्यावतीने हाती घेतली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके अचानकपणे साखर कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या वजन काट्याची तपासणी करेल. यामुळे उसाच्या वजनात शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबणार असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

महा ब्रेकिंग न्यूज : पुढच्या दोन दिवसात पुन्हा पाऊस !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1