• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

देशाच्या साखर उत्पादनात ४० लाख टनाची वाढ; महाराष्ट्राचा वाटा चक्क ३५ लाख टनांचा

शेतीमित्र by शेतीमित्र
March 5, 2021
in शेतीच्या बातम्या
0
देशाच्या साखर उत्पादनात ४० लाख टनाची वाढ;                                                         महाराष्ट्राचा वाटा चक्क ३५ लाख टनांचा
0
SHARES
0
VIEWS

 

देशातील साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर २३३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असून, यामध्ये महाराष्ट्राचा वाटा चक्क ३५ लाख टनांचा आहे.

देशात साखर गाळप करणार्‍या कारखान्यांची संख्या यंदा ४९ ने वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५३ साखर कारखाने सुरू होते, यंदा मात्र ५०२ साखर कारखाने सुरू आहेत.

देशाच्या उत्पादनात यंदाही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असून, यंदा महाराष्ट्रात या  कालावधीत ८५ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत महाराष्ट्र राज्याचे साखर उत्पादन ५० लाख टनांचे होते. तर यंदा देशाचे साखर उत्पादन ४० लाख टनांनी वाढले आहे. देशाच्या साखर उत्पादनाता महाराष्ट्राचा वाटा ३५ लाख टनांचा आहे. फेब्रुवारीअखेरच्या आकडेवारीनुसार देशातील साखर वाढ ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील साखर उत्पादनामुळेच दिसून येत आहे. गेल्या वर्षी या कालावधीत साखर उत्पादन १९४ लाख टन होते, आता ते २३३ लाख टनांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन जास्त झाले आहे. यंदा मात्र उत्तर प्रदेशात गेल्यावर्षीच्या तुलनेत २.६६ लाख टन तर तमिळनाडू राज्यात ०.२१ लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत बाजारानुसार साखरेच्या मागणीत अजूनही वाढ झालेली नाही. केंद्राने गेल्या वर्षीच्या मार्च इतकाच कोटा यंदाच्या मार्चलाही दिला आहे. उन्हाळ्यामुळे शीतपेय, मिठाई उद्योगाकडून साखरेला मागणी अपेक्षित धरून केंद्राने २१ लाख टनांचा कोटा दिला आहे. असे असले तरी ज्या प्रमाणात मागणीत वाढ अपेक्षित होती तितकी वाढ झाली नसल्याचे कारखानदारांकडून सांगितले जाते आहे. कमी किमतीत साखर मागणीचे प्रकार व्यापाऱ्यांकडून सुरुच असल्याने ‘एमएसपी’ दरात साखर विक्री करणे अद्यापही आव्हानात्मक ठरत असल्याचे कारखानदारांकडून सांगितले जाते

साखरेबाबत निर्यात धोरण जाहीर झाल्यापासून देशातून केवळ ३२ लाख टनांचे साखरनिर्यात करार झाले आहेत. शिवाय कंटेनर अडचणीमुळे साखरनिर्यातही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. दरम्यान, विशाखापट्टणम बंदर व्यवस्थापनाने साखरनिर्यातीला प्राधान्य देत साखरेसाठी जहाजे उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. असेच प्रयत्न देशातील अन्य बंदरांकडून झाल्यास याचा फायदा साखर गतीने निर्यात होण्यासाठी होऊ शकतो, असा विश्‍वास कारखानदार प्रतिनिधींनीकडून व्यक्त होत आहे.

देशातील साखर उद्योगात प्रथम कर्नाटकातील हंगाम संपण्याची शक्यता आहे. कर्नाटकात फेब्रुवारीअखेर ६६ पैकी तब्बल ५२ कारखान्यांनी गाळप थांबविले आहे. या खालोखाल महाराष्ट्रात १२, तर उत्तर प्रदेशात ११ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

साखर उत्पादनाचा गेल्या व या वर्षीच्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करता; महाराष्ट्र राज्यात गेल्यावर्षी ५०.७० लाख  टन तर यंदा ८४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी ७६.८६ लाख  टन तर यंदा ७४.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कर्नाटक राज्यात गेल्यावर्षी ३२.६० लाख  टन तर यंदा ४०.५३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गुजरात राज्यात गेल्यावर्षी ६.८३ लाख टन तर यंदा ७.४९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर तमिळनाडू राज्यात गेल्यावर्षी ३.३७ लाख  टन तर यंदा ३.१६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Tags: Maharashtra's share is about 35 lakh tonnesThe country's sugar production increased by 40 lakh tonnesदेशाच्या साखर उत्पादनात ४० लाख टनाची वाढमहाराष्ट्राचा वाटा चक्क ३५ लाख टनांचा
Previous Post

पंतप्रधान किसान सन्मान योजनेबरोबरच शेतकऱ्यांना मिळणार नवीन दोन योजनांचा लाभ

Next Post

शेतील मिळेल दिवसा आणि पुरेशी वीज; राज्य सरकारचे कृषी ऊर्जा पर्व सुरू

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
शेतील मिळेल दिवसा आणि पुरेशी वीज; राज्य सरकारचे कृषी ऊर्जा पर्व सुरू

शेतील मिळेल दिवसा आणि पुरेशी वीज; राज्य सरकारचे कृषी ऊर्जा पर्व सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230534
Users Today : 8
Users Last 30 days : 1291
Users This Month : 133
Users This Year : 4864
Total Users : 230534
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us