सोलापूर जिल्हा परिषदेने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागा केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असणारा प्रकल्प राबवला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, नदीकाठीची शेती सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यासाठी नदीकाठीच्या 131 गावात या संदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस परिषदेची स्थापना
विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम नमामी चंद्रभागा केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत केले जात आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर 131 गावात स्वच्छ भारत मिशन योजनेतून शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामं हाती घेतली जाणार आहेत. चंद्रभागेच्या आजूबाजूच्या शेतात रासायनिक खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा रासायनिक पदार्थाचा वापर कमी करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन व जनजागरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकाराने नदीकाठच्या गावोगावी बैठकीचे आयोजन करण्यात येत असून, शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नक्की वाचा : उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीत हे बदल अपेक्षीत !
विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकऱ्याच्या मोठी नाराजी होती. याच घाण पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच घाण पाणी तोंडात घ्यावे लागत असल्याने विठ्ठल भक्त निराश होत असतो. मात्र प्रशासनाने नमामि चंद्रभागा या शुद्धीकरणाचे काम पुन्हा हाती घेतल्याने लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे.
चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारण 131 गावे आहेत ज्याचे सांडपाणी नदीत मिसळत असते. या नदीकाठच्या काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी या 131 गावात स्वच्छ भारतमिशन योजनेतून शोष खड्डे, सांड पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामे हाती घेण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थानअंतर्गत पशुपालन मलमुत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प तसेच कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅसबाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरीवर्गात जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी महिनाअखेरीस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातून आलेल्या भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात भीमा नदी माळशिरस, माढा, करमाळा व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या नऊ तालुक्यांतून वाहते. त्यामुळे नदीकाठीच्या 131 गावात प्रबोधन करण्यात येणार असून, सध्या दहा गावात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आनंदाची बातमी : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1