• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, May 11, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

पावसामुळे राज्यात 3 लाख हेक्टर पिकांचे नुकसान

शेतीमित्र by शेतीमित्र
July 19, 2022
in शेतीच्या बातम्या
0
पावसामुळे राज्यात 3 लाख हेक्टर पिकांचे नुकसान
0
SHARES
0
VIEWS

राज्यात जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने मात्र जुलैमध्ये चांगलाच जोर वाढवला. संततधार पावसाने अक्षरशा शेतकऱ्यांबरोबरच सर्वांचीच धांदल उडवून दिली. राज्यात झालेल्या या अतिरिक्त पावसामुळे 3 लाख 1 हजार 498 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास नुकसानित वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

राज्यातील जवळपास सर्वंच जिल्ह्यात जुलै महिन्यात पहिल्या 15 दिवसात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बहूतांश सर्वंच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर विभागात सरासरी 75.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. विदर्भात नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट होत आहे. या जोरदार व संततधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, मूग, उडिद, ज्वारी, भात, ऊस, केळी, संत्रा, हळद आदी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ब्रेकिंग न्यूज : जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात जवळपास 74 हजार हेक्टर तर नांदेड जिल्ह्यात 36  हजार हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातही 27 हजार हेक्टरवरील पिके बाधीत झाल्याचे प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट झाले आहे.  

जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक ठिकाणी पुरामुळे जमीन खरडून गेली आहे. राज्यातील 1679 हेक्टरवरील जमीन खरडून गेल्याचे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. यात सर्वाधिक 1249 हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. तर 195 हेक्टर नांदेड जिल्ह्यातील तर यवतमाळमध्ये 142 हेक्टर आणि नागपूर जिल्ह्यात 58 हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे.

महत्त्वाचा सल्ला : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग का द्यावा ? : नितीन गडकरी यांचा सवाल

राज्यात आत्तापर्यंत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. 42 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी सुरूवातीला केलेल्या पेरण्या अति पावसामुळे वाया गेल्या आहेत. तिथे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. पिकापेक्षा तण जास्त वाढले आहे. मजुरीचा व तणनाशकांचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पाऊस सतत चालू असल्यामुळे मशागतीसाठी वाफसा मिळत नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या आहेत. त्यामुळे रोपे लहान आहेत. सततच्या पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मान्सून अपडेट : राज्यात पुन्हा 4 ते 5 दिवस पाऊस मुक्कमी  

अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यावरही लवकर वापसा येण्याची चिन्हे दिसत नाहीत. चिबड शेतजमिनीत तर पाणी साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी दुबार पेरणीही करणे अवघड आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची वेळ येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे पुरवावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

महत्त्वाच्या टिप्स : शंखी गोगलगायी नियंत्रणाच्या 13 टिप्स !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 1679 hectares of land in the state was erodedAjit Pawar's demand for help to farmers affected by heavy rainsCrop loss is highest in Yavatmal districtThe growth of crops was stunted due to lack of sunlightअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अजित पवारांची मागणीयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसानराज्यातील 1679 हेक्टरवरील जमीन खरडून गेलीसूर्यप्रकाश नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली
Previous Post

जीएसटी निणर्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फटका

Next Post

महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

महाराष्ट्राच्या तीन पिकांच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

229481
Users Today : 21
Users Last 30 days : 1220
Users This Month : 753
Users This Year : 3811
Total Users : 229481
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us