राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान तर 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी कालपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

हे वाचा : कृषी प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ
या निवडणुकीसंदर्भात बोलताना राज्य निवडणूक आयुक्त मदान म्हणाले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होणार आहेत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहेत. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहेत. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
मोठी घोषणा : आता ग्रामपंचायत हद्दीतच होणार स्वयंचलित हवामान केंद्रे
18 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर अकोला (266), अमरावती (257), औरंगाबाद (219), बीड (704), भंडारा (363), बुलडाणा (279), चंद्रपूर (59), धुळे (128), गडचिरोली (27), गोंदिया (348), हिंगोली (62), जळगाव (140), जालना (266), कोल्हापूर (475), लातूर (351), नागपूर (237), नंदुरबार (123), उस्मानाबाद (166), पालघर (63), परभणी (128), पुणे (221), रायगड (240), रत्नागिरी (222), सांगली (452), सातारा (319), सिंधुदूर्ग (325), सोलापूर (189), ठाणे (42), वर्धा (113), वाशीम (287), यवतमाळ (100), नांदेड (181) तर नाशिक जिल्ह्यातील 196 अशा एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

मोठी बातमी : खताच्या किमती स्वस्त : नवीन दर जाहीर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1