आपल्याला पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी प्रतीवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर देण्याची गरज असून, देशातील साखरेचे अतिरिक्त उत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या आहे. असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.
मोठी बातमी : लातूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची 85 लाखाची फसवणूक
मुंबईत येथे राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार 2022 वितरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कृषी क्षेत्रामध्ये आता विविधता आणण्याची गरज असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, भविष्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योग क्षेत्राने पर्यायी इंधन आणि इंधन निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

आपली 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, आपला कृषी विकासदर केवळ 12 ते 13 टक्के आहे. ऊस उद्योग आणि शेतकरी हे आपल्या उद्योगवाढीचे इंजिन आहेत. त्यामुळे उसापासून महसूल वाढवण्यासाठी पुढील वाटचाल सहनिर्मितीची असावी. त्यासाठी साखर उद्योगाने साखरेचे उत्पादन कमी करून जास्तीत जास्त सहउत्पादनांवर भर दिला पाहिजे. भविष्यातील तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात केली पाहिजे. नेतृत्वबळाच्या आधारावर ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर केले पाहिजे. यामुले शेतकरी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनतील, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
महत्त्वाची बातमी : 1 सप्टेंबरपासून दूध महागणार
दरम्यान, यावर्षी आमची साखरेची गरज 280 लाख टन असताना, उत्पादन 360 लाख टनांपेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील परिस्थिती पहाता या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, इथेनॉलची गरज खूप जास्त असल्याने आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे गडकरी म्हणाले.
गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता 400 कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. बायोइथेनॉलवर चालवल्या जाणार्या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची ही वेळ असल्याचे गडकरी म्हणाले.
हे नक्की वाचा : शेतकरी आत्महत्येचा मुद्दा मला अस्वस्थ करतो : शरद पवार
सरकारने भारतात फ्लेक्स इंजिन सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, बजाज, हिरो आणि टीव्हीएस कंपनीने आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे. अनेक कार उत्पादकांनीही फ्लेक्स इंजिनवर चालणारी कार मॉडेल्स बनवण्याचे आश्वासन दिले असल्याचेगी गडकरींनी यावेळी सांगितले.

ऊस तोडण्यासाठी कापणी तंत्रज्ञानाच्या वापरात इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास वाव असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, त्यामुळे अर्थव्यवस्थेतले एक वर्तुळ पूर्ण होणे शक्य होईल. सध्या साखर उद्योगाला अनेक समस्या भेडसावत आहेत. वीज खरेदीचे दर तर्कसंगत करण्याची गरज आहे. काही राज्ये, केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर देत नाहीत, हे ऊस उद्योग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसण्याचे एक कारण असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
आनंदाची बातमी : आजपासून ‘या’ जिल्ह्यात पाऊस : पंजाबराव डख यांचा अंदाज

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1