राज्यातील काही भागात खरीप पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीची गडबड सुरु झाली आहे. खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीबाबत येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नक्की वाचा : खुद्द कृषी आयुक्तांनी सांगितली… राज्यातील खरीपाची सध्यस्थिती
राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, मुबलक प्रमाणात होण्यासाठी तसेच शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आहे. याबाबत निविष्ठा व गुण नियंत्रणचे कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली माहिती दिली आहे.

हा कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास सूरू राहणार आहे. या कक्षाशी शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी 8446117500, 8446221750 व 8446331750 हे मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्रमांकवर शेतकरी आपल्या तक्रारी सांगू शकतात. तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकाही शेतकऱ्यांना संपर्क करता येईल. यासोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] या ईमेल पत्त्यावरही पाठविता येईल, असेही कृषी संचालक पाटील यांनी कळवले आहे.
मोठी घोषणा : राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता
याबाबत अधिक माहिती सांगताना कृषी संचालक पाटील म्हणाले, बियाणे, खते व किटकनाशके याबाबत तक्रारी असतील तर त्या कोऱ्या कागदावर लिहून व्हॉटस्ॲप वर किंवा ई-मेलवर पाठवल्या तरी तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. व्हॉट्सॲपद्वारे तक्रारी पाठवणे शक्य नसल्यास वरील मोबाईल क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदविल्या तरी चालतील.
संबंधित शेतकऱ्यांनी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी व अडचणींचा संक्षिप्त तपशिल मोबाईल क्रमांक, टोल फ्री क्रमांक व ई-मेलवर कळवाव्यात असे, आवाहनही करण्यात आले आहे.
शुभवार्ता : अंडी उत्पादनात भारत नंबर 3 वर

https://www.facebook.com/shetimitramagazine03