महागाईच्या भड्यात पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता लिंबू आणि हिरवी मिरचीनेही तेजीचा भाव खाल्ला आहे. यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच लिंबाने आपला तोरा कारम ठेवला असून गेल्या महिन्यापासून हिरव्या मिरचीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
आनंदाची बातमी : आता कृषी विभागात महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा ?
सध्या खुल्या बाजारात 120 रुपयाला एक किलो मिरची तर 20 रुपयाला तीन लिंबे असा उच्चांकी दर आहे. लिंबाचे दर वाढले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकर्यांना होताना दिसत नाही. मात्र लिंबाच्या वाढत्या मागणीचा फायदा व्यापारी करून घेत आहेत. तर मिरचीचा थेट फायदा शेतकर्यांना होत आहे. सध्या महागाईची चर्चा सुरू झाली की, पेट्रोल-डिझेल मागे पडले असून आता लिंबू आणि मिरचीच्या दरावर चर्चा चांगलीच रंगत आहे.

नक्की वाचा : यंदा आंबाप्रेमींना मोजावे लागणार जास्त पैसे !
हंमाच्या सुरूवातीपासून लिंबाची मागणीच्या तुलनेत उपलब्धता नव्हती. वातावरणातील बदलांमुळे उत्पादनात घट झाली होती. अनेक लिंबू बांगांमध्ये फळांची मोठी गळ झाली होती. त्यामुळे लिंबू बागांचे यंदा म्हणावे असे उत्पादन लिंबू बागायतदार शेतकर्यांना मिळाले नाही. यंदा सरासरी केवळ 30 टक्केच लिंबू विकण्यासाठी हाती लागले आहे. लिंबाला यंदा चांगला दर मिळाला असला तरी उत्पादन घटल्याने शेतकर्यांना म्हणावा असा फायदा झालेला नाही. विशेष म्हणजे ठोक बाजारात लिंबू वजनावर विकले जात मात्र किरकोळ बाजारात ते नगावर विकले जाते. त्यामुळे मध्यस्थी असलेल्या व्यापार्यांना मात्र यामुळे चांगलाच फायदा झाला आहे.
लक्षवेधी बातमी : लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा !
सध्या भाजीपाला मंडईत सर्वच भाज्यांचे दर नियंत्रणात असले तरी हिरव्या मिरचीच्या दराने मात्र चांगलीच उचल खाल्ली आहे. हिरव्या मिरचीचे सर्वच ठिकाणी 100 पार केली आहे तर काही ठिकाणी 120-130 रुपये किलो दरानेही हिरवी मिरची विकली जात आहे. यंदा मिरची उत्पादनाच्या बाबतीतही उत्पादकता चांगलीच घटली आहे. रात्रीच्या गारव्यामुळे आणि दिवसभरातील तीव्र उन्हामुळे अनेक भागातील मिरचीवर चुरडा-मुरडा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक मिरचीचे प्लॉट फेल गेले आहेत. ज्यांच्या कडे प्लॉट शिल्लक होते. त्यांना त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. एकंदरीत अशा परिस्थितीत मिरची उत्पादनासाठी औषध आणि खतामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

महत्त्वाची बातमी : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सध्या किरकोळ बाजारात 20 रुपयांना तीन लिंबे मिळत असून, मिरची 30 ते 35 रुपये पाव किलो मिळत आहे. या तुलनेत कांदा व बटाट्याचे दर स्थिर आहेत. सर्वसाधारण बटाटा व कांदा 20 रुपये किलो या दराने किरकोळ बाजारत उपलब्ध आहेत. तर वांगी 20 रुपये किलो, काकडी 15 रुपये किलो, भोपळा 20 रुपये किलो असे दर आहेत. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर 20 ते 30 रुपये पेंडी मिळत आहे. तर पालक, शेपू या भाज्यांही 20 रुपये पेंडी या दराने मिळत आहेत. उन्हाळा असला तरी बाजारातील पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने त्यांचे दर दिवसे दिवस कमी होताना दिसत आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1