अनेक दिवसापासून संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा उत्पादकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलासा दिला असून, त्याच्या विविध मागण्याचा विचार करून विशेष पॅकेज मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन त्यांनी कोकणातील बायातदारांना दिले आहे.
हे वाचा : संघटित लढ्याशिवाय ऊसतोड मजुरांना पर्याय नाही : डॉ. डी. एल. कराड
कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र विद्या कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसिलदार (महसूल) तेजस्विनी पाटील, पणन विभागाचे मिलींद जोशी, लीड बँकेचे मॅनेजर एन. डी. पाटील, ज्येष्ठ आंबा बागायतदार काका मुळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित केली जाईल. कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ब्रेकिंग : यंदा कापूस भाव खाणार
आंबा कॅनिंगचा हमीभाव ठरविण्यासाठी पणन विभाग, कृषी विद्यापीठ व आंबा बागायतदार यांनी चर्चा करावी, असे निर्देश देवून सामंत म्हणाले, यावर्षीपासून कॅनिंग उद्योजकांनी स्थानिक आंबा व्यावसायिकांकडील आंबा कॅनिंगसाठी कमी पडला तरच बाहेरील राज्याकडून आंबा आयात करावात अशीही सूचना कॅनिंग उद्योजकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.
काजू बोंडाना अल्कोहोल व वायनरीची मान्यात मिळण्याकरिता प्रयत्न केले जातील असे अश्वासन देवून उद्योगमंत्री सामंत म्हणाले, लांजा तालुक्यातील एका शेतकऱ्यांने काजू बी सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे. त्याच्या यंत्राला पेटंट मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. विशेषत: हे यंत्र काजू उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी करावे, यासाठी सिंधुरत्न योजनेतंर्गत या यंत्राला अनुदान देण्याचा प्रस्तावही मांडण्याचे अश्वासन त्यांनी या बैठकीत दिले.
मोठी बातमी : पीएम किसान योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम
आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी देण्यात येणाऱ्या विमा व पीक कर्जाबाबत बँक, कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याशी उद्योग मंत्री सामंत यांनी चर्चा केली. या बैठकीला कोकणातील आंबा व काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेकिंग : या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यात मदत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1