Soil Testing : राज्यातील शेतीचे आरोग्य (Agriculture Health) नको त्या खतांच्या मात्रामुळे खराब झाले आहे. शेतजमिनीतील कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग (Agriculture Department) आता माती परीक्षणावर (Soil Testing) भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची (Post Office) मदत घेतली जाणार असून, शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत मोबाईलवर माती परीक्षणाचा अहवाल (Soil Testing Report) मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Ministr) धनंजय मुंडे यांनी दिली.
फायद्याची माहिती : बांबू लागवड योजनेसाठी या 4 जिल्ह्याची निवड
लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या (Phoenix Foundation) कृषी महाविद्यालय, बांबू टीश्यूकल्चर, (Bamboo Tissueculture) बांबू फर्निचर (Bamboo furniture) प्रकिया उद्योगाच्या भेटीनंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल, (Pasha Patel) कृषी शास्त्रज्ञ अखिल रिझवी, लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेतजमिनीचे आरोग्य (Soil Health) सुधारण्यासाठी तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करणार असल्याचे सांगून, कृषिमंत्री मुंडे म्हणाले, माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्स माती परीक्षण केंद्राचा पत्ता, स्वताचा मोबाईल नंबरसह पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) देईल. त्यानंतर मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल, अशी सुविधा लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात दिवसेंदिवस शेतजमिनीतील पिकासाठी आवश्यक असलेले कर्ब कमी होत चालले असल्याचे सांगून कृषिमंत्री मुंडे म्हणाले, हे असेच राहिले तर जमिनी उपजावू राहणार नाहीत. हे कर्ब वाढविण्यासाठी आता कृषी विभाग पुढाकार (Initiative) घेणार आहे. यापुढे माती परीक्षण करताना मातीची कोणत्या पिकासाठी योग्यता आहे, कोणत्या पिकासाठी नाही, कोणत्या पिकामुळे मातीचे कर्ब वाढेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गुडन्यूज : यंदा डाळिंबाचे पैसेच होणार !
बांबू पिका संदर्भात बोलताना कृषिमंत्री (Agriculture Ministr) मुंडे म्हणाले, बांबू हे पीक मातीचे आरोग्य वाढविणारे आहे. याची जाणीव झाल्यामुळे लातूर आणि सातारा येथे प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडमध्येही केली जाणार आहे. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. बांबूसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये दिले जाणार असून राज्यात फळबागसाठी मनरेगातून जसे अनुदान दिले जाते तसे सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान (Subsidy) देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बांबू हे हमखास पैसे देणारे पीक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोतही बांबू शेतीमुळे पुन्हा प्राप्त होणार असल्याचे सांगून, कृषिमंत्री (Agriculture Ministr) मुंडे म्हणाले, बांबू हा बहुउपयोगी (Multipurpose) आहे. कितीही चांगले फर्निचर केले तर त्याचे आयुष्य 15 ते 20 वर्ष असते मात्र बांबूचे फर्निचरला (Bamboo furniture) 100 वर्ष काहीच होत नाही. त्यामुळे जगभर बांबूचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर वाढतो आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात बांबू लागवडीची चळवळ (Bamboo Cultivation Movement) सुरु व्हायला हवी. यापुढे आपणही या बांबू लागवडीच्या चळवळीचा कार्यकर्ता (Activist) म्हणून काम करणार असल्याचे सांगून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे आवाहन कृषिमंत्री (Agriculture Ministr) मुंडे यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार पाशा पटेल यांनी आपल्या प्रास्ताविकात बांबू, बांबूचे फायदे (Benefits of Bamboo) सांगितले. बांबू विषयातले तज्ज्ञ संजीव करपे यांनी बांबूबद्दल वैज्ञानिक, व्यवहारिक मांडणी असलेले सादरीकरण केले.
मोठी बातमी : कांदा व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी

https://www.facebook.com/shetimitramagazine03