कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात देखील काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे.
आनंदाची बातमी : मे महिन्यात उन्हापासून दिलासा तर 109 टक्के पूर्व मोसमी पावसाचा अंदाज
देशातील एकूण उत्पादनापैकी महाराट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते. बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षत विविध कारणांनी कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. अशातच कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतं आहे.

लक्षवेधी बातमी : उष्णता अजून वाढणार : स्कॉटलंडच्या हवामान शास्त्रज्ञाचा भारताला गंभीर इशारा
हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सारने HOS-3 नामक एक कांद्याची जात विकसित केली आहे. या कांद्याच्या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, या जातीपासून केवळ उत्पादनचं चांगले मिळते असे नाही तर या जातीच्या कांद्याची साठवणुकीक्षमता देखील चांगले साल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या कांद्याला डोंगळे खुपच कमी येतात. त्यामुळे ही कांद्याची जातं लवकर खराब होणार नाही. या नवीन जातीच्या कांद्याची हिच विशेषता पाहून दक्षिण भारतातील एका खासगी बियाणे कंपनीने विद्यापीठाशी करार केला आहे, जेणेकरून ते देशातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल.
महत्त्वाची बातमी : आता अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण शक्य ?
या नवीन HOS-3 कांदा जातीबद्दल असा दावा केला जातो की, कांद्याच्या या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 350 क्विंटलपर्यंत आहे. या जातीचे कांदे हलके आणि कांस्य रंगाचे गोलाकार असतात. साठवणुकी दरम्यान त्यात फक्त 3.7 टक्के बोल्टिंग आणि 7.2 टक्के अंकुर फुटतात.
याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितलं जातं आहे. कंपनी आणि विद्यापीठ यांच्यातील करारानंतर आता या जातींचे कांद्याचे बियाणे इतर राज्यांतही पोहोचणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आता हे बियाणे कंपनी विद्यापीठाला परवाना शुल्क भरणार असून, त्याअंतर्गत बियाण्यांचे उत्पादन आणि विपणनाचे सर्व काम संबधीत कंपनीला मिळणार आहे. पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना HOS-3 या कांद्याचे बियाणे मिळू शकेल असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे नक्की वाचा : बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ब्रेक द लाईफस्टाईल नवी संकल्पना
कोणत्याही शेतकऱ्याचे उत्पन्न हे त्याच्या लागवडीचे तंत्र आणि पिकाच्या जातीवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी बनावट वाण न वापरता सुधारित वाण निवडून लागवड करावी, असा सल्ला दिला जातो. तसेच कांद्याचे बियाणे योग्य ठिकाणाहून खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ नेहमी देतात. कांद्याचा विचार केला तर त्यात पुसा रेड ही जात खूपच लोकप्रिय झाली आहे, जे प्रति हेक्टर 200 ते 300 क्विंटल देते. तसेच हिस्सार-2 या कांद्याच्या जातीपासूनही 300 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
आनंदाची बातमी : देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !
सुधारित बियाणे वितरणासाठी झालेल्या कराराबाबत बोलताना कुलगुरू प्रा. बी. आर. कंबोज म्हणाले की, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे अशा करारांच्या माध्यमातून येथून विकसित झालेले प्रगत वाण व तंत्र अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असा विद्यापीठाचा मानस आहे. गेल्या एका वर्षात विविध पीक वाणांसाठी विविध खाजगी भागीदारांसोबत एकूण नऊ करार करण्यात आले आहेत. निश्चितच HOS-3 या कांद्याच्या जातीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1