राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. राज्यातील एकूण 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
मोठा निर्णय : यापुढे अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती
राज्यामध्ये 4 ते 20 मार्च 2023 या कालावधीत गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसात कडधान्य, फळपीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कालावधीत राज्यातील 38 हजार 606 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.
त्यानंतर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामध्ये 15 ते 20 मार्च या कालावधीत 1 लाख 60 हजार 880 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, अशी माहिती पुनर्वसन विभागाने दिली आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यात 3 दिवस पुन्हा यलो अलर्ट !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1