राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नाशिक येथे सोमवारी दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सोमवारी 198 शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. मात्र या सन्मान सोहळ्यातील मानाचा समजल्या जाणाऱ्या कृषीरत्न पुरस्काराचे विजेते राजेंद्र पवार यांनी हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्विकारण्यास नकार दिला याबाबात सध्या राज्यभार चर्चा सुरू झाली आहे.
हे नक्की वाचा : भारतीय शेतकरी शेतीतून कमावतो तरी किती ? NSSO चा रिपोर्ट

बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला असता किंवा मग कृषी खात्याच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे पसंत केले असते, असे पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाची घोषणा : आमिर खानने केली शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेची घोषणा
राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार न स्वीकारण्याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आजवर मी शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फुले दाम्पत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मते मांडली जात आहेत. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक अराजकता निर्माण करत आहेत. त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी पुरस्कार कसा स्वीकारावा ? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किंवा अगदी एखाद्या कृषी कार्यालयात जाऊन हा पुरस्कार मी स्वीकारला असता. असेही ते म्हणाले.
महत्त्वाची बातमी : कृषी राजधानी म्हणूनही महाराष्ट्राची नवी ओळख व्हावी : राज्यपाल
राजेंद्र पवार या भुमिकेबाबात सध्या राज्यभार चर्चा सुरू असून, कृषी विभाग त्यांना हा पुरस्कार आता कसा देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरोग्य टिप्स : मे हिटपासून असा करा बचाव

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1