राज्य सरकारानं ऊस दराच्या एफआरपी संदर्भात काढलेल्या आदेशावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानी पाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत देखील आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून, त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिर्डीतून आंदोलनाचं रणशिंग : सदाभाऊ खोत यांनी 26 फेब्रुवारीपासून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत केला आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार शेतकरीद्रोही असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत शिर्डीतून या आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहेत.

अन् माझा शेतकरी उपाशी : महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. शुगर केन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली FRP ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता, पण या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. ही FRP आता दोन टप्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी 10 % रिकवरीचा आहे. दुसरा टप्पा मराठवाडा विदर्भसाठी 9.5 % रिकव्हरीचा आहे. याच्यातुन तोडणी वाहतूक वजा करायची आहे. दुसरा हप्ता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांनी द्यायचा आहे आणि कारखान्याने केलेले जे खर्च आहेत, ते सर्व खर्च वजा करून राहिलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे की, साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे.
हेही वाचा
नाबार्डची शेतीसाठी 1 कोटी 43 हजार कोटीची तरतूद
पाणी फाऊंडेशनच्या सोयाबीन डिजिटल पुस्तकाचे झाले लोकार्पण
आता राहणार शेळी-मेंढी विकासाला प्राधान्य
शेतकऱ्यांना मातीत घालणारं सरकार : सदाभाऊ खोत म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे. असं हे शेतकरीद्रोही सरकार या राज्यांमध्ये काम करत आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला शिर्डी जिल्हा अहमदनगर येथून रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/

शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा