शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने बियाणे महोत्सव एका अर्थाने ‘क्रांती’ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोट येथे केले.
शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी येथे 1 ते 6 जून दरम्यान होणाऱ्या बियाणे महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडला.
महत्त्वाची बातमी : पीक कर्जावरील व्याज परतावा परत सुरू करा : मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी
याच कालावधीत प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

अकोट येथील मुख्य सोहळ्यास विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, अकोट बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर, कृषी उपसंचालक मनोहर मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोठी बातमी : शेतकऱ्यांना इतर नॅनो खतेही उपलब्ध होतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या भाषणात पालकमंत्री कडू म्हणाले की, बियाणे महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हिम्मत करावी लागते. शेतकरी शेतकऱ्यांना बियाणे विकत देईल. शेतकरी हा शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही. विविध बियाणे उत्पादक कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. ही शेतकऱ्याची एक प्रकारची लूट आहे. मात्र केवळ अशी ओरड करून चालणार नाही, त्यासाठी बियाणे महोत्सवाची कल्पना ही एक उत्तम पर्याय आहे. या उपक्रमामुळे किमान 5 ते 6 कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांना होईल, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पाहिल्यास बियाणे महोत्सव हे एक क्रांतीची सुरुवात आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. शेतकरी हा एक संशोधक आहे, हे ही या उपक्रमातून दिसून आले आहे. या उपक्रमाचा पुढचा टप्पा शेतकऱ्यांना खते, फवारणीची औषधें उपलब्ध करून देणे हा असेल, असेही त्यांनी सांगितले.
मोठी बातमी : सोयाबीन बियाण्याची भरमसाठ दरवाढ : शेतकरी हवालदील
यावेळी बोलताना आ. अमोल मिटकरी म्हणाले, बियाणे महोत्सव हा शेतकऱ्यांना सन्मान देणारा उपक्रम आहे. असाच सन्मान शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता. आजचा हा उपक्रम त्याचीच आठवण करून देतो. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा पीक पेरा करता यावा तसेच वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत यांनी या महोत्सवात पहिल्याच दिवशी 2200 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून, 912 क्विंटल बियाणे विक्री झाले असल्याचे सांगितले.
आनंदाची बातमी : स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रूटसाठी मिळणार ९० टक्के अनुदान

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1