आपल्याला विद्राव्य खतांची आयात करावी लागते. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर दुप्पट झाले आहेत. परिणामी देशात विद्राव्य खतांच्या किमती 50 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच खतांची भीषण टंचाई जाणवत आहे. याचा थेट परिणामी पिकांवर आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
आनंदाची बातमी : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर
फळबागांना विविध टप्प्यांत वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खते द्यावी लागतात. यात 19-19-19, 13-0-45, 0-52-34 आदींचा समावेश आहे. पिकांना त्या त्या अवस्थेत ती खते मिळाली नाहीत तर प्रतिकूल परिणाम होतो. परंतु सध्या काही ग्रेडसच्या विद्राव्य खतांची टंचाई भासत आहे. ही खते शेतकऱ्यांना मिळत नाहीत. सर्वच ग्रेडची खते 50 ते 70 टक्क्यांनी महाग झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढला आहे.

आनंदाची बातमी : तुकडाबंदीचे नियम रद्द, आता एक – दोन गुंठे जमिनीचा देखील करता येणार व्यवहार
कोरोनानंतरच जागतिक पातळीवर खतांची समस्या निर्माण झाली होती. अनेक खत उत्पादक देशांनी निर्यातीवर बंधने आणली. त्यामुळे दरात वाढ झाली होती. मात्र आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे खत समस्या आणखी गंभीर बनली. आंतरराष्ट्रीय बाजारात भीषण टंचाई निर्माण झाली. त्यामुळे फॉस्फोरिक ॲसिड आणि पोटॅशचे दर जवळपास दुप्पट झाले. परिणामी संयुक्त आणि विद्राव्य खतांचे दरही गगनाला भिडले. देशात सध्या विद्राव्य खतांची मोठी टंचाई भासत आहे. तसेच दरातही 50 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
महत्त्वाची बातमी : सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणार : कृषीमंत्री दादाजी भुसे
देशात विद्राव्य खतांच्या दोन किंवा तीन ग्रेडचेच उत्पादन होते. इतर ग्रेड्सची आयात केली जाते. कच्चा माल आयात करून या ग्रेडच्या खतांचे उत्पादन करायचे म्हटल्यास खर्च खूपच वाढतो. त्यामुळे आयात करणेच परवडते. भारतात विद्राव्य खतांची आयात चीन, युक्रेन, कॅनडा, हॉलंड, थायलंड, जॉर्डन आदी देशांतून अधिक होते. या देशांतून कच्चा माल आणून खत तयार करायचे म्हटल्यास त्याचा खर्च खूप वाढतो. मग या दरात शेतकरी खते घेतील की नाही, याचाही विचार करावा लागतो. परिणामी खते मोठ्या प्रमाणात आयात करण्याचे धाडस कुणी करत नाही, असे खत उद्योगातील जाणकार विजयराव पाटील यांनी सांगितले. सध्या युद्धामुळे पोटॅश उपलब्ध होत नाही. त्यामुळे इतर ग्रेडचे खतही बनवता येत नाही. पोटॅशची 900 रुपयांना मिळणारी बॅग आता 1700 रुपयांना झाली. त्यामुळे विद्राव्य खतांचेही दर वाढले.

मान्सूनची बातमी : केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 10 दिवस आधीच धडकणार
विद्राव्य खतांमध्ये सामान्य ग्रेडची एक बॅग जी मागील हंगामात 350 रुपयांना मिळत होती. ती आता 500 ते 550 रुपयांना मिळत आहे. तर 5234 ग्रेडची बॅग 3050 रुपयांनी मिळायची, ती आता 5200 रुपयांना मिळत आहे. या दरवाढीमुळे शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत आले आहेत. अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे दराची शाश्वती नाही. मात्र उत्पादन खर्च तर वाढला. यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्या वाढल्या आहेत.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1