सातत्याने सुरू असलेल्या पावसाचा फटका मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सुमारे 14 लाख हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कापूस भुईसपाट झाला आहे तर सोयाबीनला कोंब फुटु लागले आहेत. तसा अहवालही विभागीय कार्यालयात सादर करण्यात आला असून, आता पंचनाम्याचा घाट न घालता थेट मदत देण्याची मागणी होत आहे.
मरठवाड्याच्या सिमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकर्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, खरीपाची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. खरीप पिकांची काढणी सुरू झाल्यापासून, सतत पाऊस सुरू असल्याने 60 टक्के क्षेत्रावरील काढल्याही जमिनदोस्त
भाजीपाल्यासह फळबागा जमिनदोस्त
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील खरीपाच्या पिकाला या पावसाचा फटका बसलेला आहे. एवढेच नाही तर भाजीपाल्यासह फळबागा जमिनदोस्त झाल्या आहेत. पावसामुळे शेती पिकाचे तर नुकसान झालेच आहे परंतु, उस्माबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. नगदी पीक म्हणून शेकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडेच असतो. तर आजही परभणी हिंगोली जिल्ह्यात कापसाचे पिक घेतले जात आहे. खरीपातील इतर पिकांची काढणी ही अंतिम टप्प्यात असली तरी सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके शेतात असतानाच पावसाने कहर केला आहे.

मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
मराठवाड्यात वार्षिक पावसाची सरासरी ही 671.6 मिलीमीटर आहे. आतापर्यंत 894.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 221 मिलीमिटर जास्तीचा पाऊस झाला आहे. मरावाड्यातील आठ ही मोठे प्रकत्प हे तुडुंब भरुन वाहत आहेत तर सोयाबीन, कापूस हे पाण्यात आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर काही दिवस पावसाने उसंत घेतली होती पण गेल्या चार दिवसापासून पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. नुकसान पाहणीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आता लोकप्रतिनीधी बांधावर पोहचत आहेत.
सरसकट मदत नव्हे पंचनाम्याचे आदेश
सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यामुळे पंचनाम्याचा बाऊ न सरसकट नुकसान झाल्याचे ग्राह्य धरुन मदतीची मागणी हे शेतकरी करीत आहेत. तर हिंगोली येथे शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट कृषीमंत्री यांना फोन करून शेतातील वास्तव काय आहे हे सांगितले. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मदतीबाबत काही न बोलता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी यांना दिले जातील असे आश्वासन दिले आहे.

परभणी जिल्ह्यात प्रकल्पही ओव्हरफ्लो
परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पावसामुळे आतापर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर पाथरी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिके ही पाण्यात आहेत. शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीनला कोंब फुटु लागले आहेत. प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले असून दुधना आणि पूर्णा नदीपात्र हे ओसंडून वाहत आहे. शेतकऱ्यांना पीक काढणीची कामेही करणे मुश्किल झाले आहे.
लातूर जिल्ह्यात सरसकट मदतीची मागणी

लातूर जिल्ह्यात आता पर्यंत 805.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला असून मांजरा धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नदीलगतच्या शेत जमिनीमध्ये पाणी शिरल्याने शिरुरअनंपाळ तालुक्यातील सोयाबीन हे पाण्यात आहे. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पिकाची पाहणी करूम पंचनाम्यासाठी काही उरलेच नाही. राज्य सरकारने सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
भूम, वाशी तालुक्याट ढगफुटी
गेल्या दोन दिवसांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी या तालुक्यांध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचे सांडवे सोडण्यात आले आहेत. तर पावसामुळे सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले आहे. भूम- वाशी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली आहे. शिवाय अणखीन पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने सोयाबीनची काढणी होणार की नाही, हा शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आहे.
हेही वाचा :
सोयाबीन लागवडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान
सोयाबीनवरील किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
कपसावरील गुलाबी बोंडअळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण !
कापूस पिकावरील मावा व तुडतुड्याचे एकात्मीक नियंत्रण
बार्शी तालुक्यातही धुव्वाधार पाऊस
मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बार्शी तालुक्यातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, तालुक्यात दोन दिवसात अक्षरश: ढगफुटी झाली आहे. दिवसा पाऊस उघडतो तर रात्री धुव्वाधार पाऊस पडतो असे चार दिवसापासून होत आहे. ग्रामीण भागातील नद्या-नाल्याना पाणी आल्याने काही ठिकाणची वाहातूक बंद असून, अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने खरीपाची पिके पाण्यात गेली आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा