राज्यातील शेती वीजपंपच्या वीजेचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चालला आहे. शेतीला मिळणाऱ्या रात्रीच्या विजेमुळे शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास वीज द्यावी, अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांकडून होत असताना टाटा पॉवर उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने सोलापुरात 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..?
दरम्यान, मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत्या काळात शेतकऱ्यांना 12 तास वीज दिली जाईल अशी ग्वाही दिली होती. वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणण्याचा सरकारचा विचार असून, यातून चार हजार मेगावॅट वीजेचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सोलापुरातील या प्रकल्पामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची समस्या भासणार नाही. असे संकेतही मिळाले असून हा प्रकल्प कधी सुरू होणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. या प्रकल्पासाठी महावितरणने टाटा पॉवरला लेटर ऑफ अॅवॉर्ड दिले असून, प्रकल्पाच्या कामाची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होणार आहे.
मोठा निर्णय : ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचे दरपत्रक जाहीर
राज्यातील ऊर्जा वापराचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी महावितरणने टेंडर मागवले होते. त्यामध्ये टीपीआरएलला सदरचे टेंडर मिळाले आहे. आता काही दिवसांमध्ये कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे मोठा लोड कमी होणार आहे.

वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून 18 महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करावा लागणार असल्याचे टीपीआरएलचे सीईओ आशीष खन्ना म्हणाले. या प्रकल्पामुळे आता टीपीआरएलची एकूण अपारंपरिक ऊर्जा क्षमता 5786 मेगावॅटवर पोहोचणार आहे. दरम्यान, राज्यात दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली आहेत.
आनंदाची बातमी : नागपूर येथे 25 ते 28 नोव्हेंबर ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1