शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा मला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा एकत्रितपणे विचार करायला हवा, असे भावनात्मक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केले. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या द्राक्ष परिषदेच्या उद्घाटन प्रसांनी ते बोलत होते.
आनंदाची बातमी : आजपासून ‘या’ जिल्ह्यात पाऊस : पंजाबराव डख यांचा अंदाज
द्राक्ष बागायतदारांनो आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय. या दोन वर्षात अनेक संकटे आली. यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रत्येक फळांची संघटना झाली परंतु द्राक्ष बागायतदार संघाने जे काम केले ते देशात कोणत्याच संघाने केले तसे काम कोणत्या संघाने केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

1907 साली स्थापना झालेल्या या द्राक्ष संघात सुमारे 35 हजारांहून अधिकचे शेतकरी सहभागी असल्याचे सांगून पवार म्हणाले, त्यामुळेच आता हा संघ द्राक्ष शेती मर्यादित भागापूरती मार्यदित राहिलेली नाही. तो आता राज्याच्या विविध भागात विस्तारलेला आहे.
हे नक्की वाचा : कृषी संशोधन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे : गडकरी
गेली दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला बंदी होती, अशातच चीनने निर्यातीच्या नियमात अटी टाकल्या. त्यानंतर ज्या मर्यादा आल्या, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शरद पवार म्हणाले. मागील राज्य सरकारने आणलेले वाईन विक्रीचे धोरण हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक बाजारपेठ मजबूत होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, देशातून 8 टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर 92 टक्के द्राक्षाची भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ कशी मजबूत होईल ? आर्थिक उलाढाल कशी मोठी होईल ? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आपण बोलणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
धक्कादायक : आत्महत्येचे सत्र सुरुच : जालन्यात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न खूप आहेत. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून, पवार म्हणाले जाणकार, कष्टकरी, विज्ञानाचा स्वीकार करणारा शेतकरी म्हणून द्राक्ष बागायतदारांची ओळख आहे. ती अबाधित राहील असेच काम तुम्ही कराल अशीहि अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसंख्या वाढत असताना शेतीवर किती बोजा टाकायचा याचा विचार करायला हवा असे सांगून पवार म्हणाले, आजही देशातील 60 टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
मोठी घोषणा : कोकणातील आंबा बागायतदारांना उद्योगमंत्र्यांचा दिलासा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1