परंपरगत शेतीसोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असून, सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
मान्सूनची बातमी : केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 10 दिवस आधीच धडकणार
सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार पणन, पशु संवर्धन व दुग्ध विकास, तसेच कृषी विभाग अशा पाच विभागाची संयुक्त बैठक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीत सेंद्रिय शेती धोरण, सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी दादाजी भुसे बोलत होते.

हे नक्की वाचा : शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
या बैठकीला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मोर्फाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक युगेंद्रदादा पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे उपस्थित होते. तसेच कृषी, पणन, सहकार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे विविध अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाचा निणर्य : शिल्लक उसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त
यावेळी बोलताना दादाजी भुसे म्हणाले, सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून, देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा. त्याचबरोबर इतर अपारंपारिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी, यासाठी आयोजीत केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करू : सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती दिली जाईल, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल. त्याचबरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमातुन सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल असेही पाटील म्हणाले.
पशुंच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त : मंत्री सुनील केदार
राज्यातील शेतक-यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशुंना सेंद्रिय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल यासाठीचा प्रस्ताव विभागामार्फत तयार करण्याची तयारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी दाखवली आहे. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. कोरोनानंतर प्रथिनेयुक्त आहारांचे महत्व लोकांना पटल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. तसेच याविषयावर जनजागृती होत असल्याचे केदार यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभाग सहकार्य करणार : राजेंद्र शिंगणे
सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतानाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

हे नक्की वाचा : महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
ते म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात. मात्र, ज्याच्या लेबलवर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते, मात्र त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाहीत याची खात्री नसते. त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते. त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच यावर ‘जैविक भारत’ चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम असल्याचे मंत्री शिंगणे यांनी सांगितले. सदर नियमांची FDA मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनांवर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले.
महत्त्वाची घोषणा : रासायनिक खतांच्या नव्या किमती जाहीर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1