पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पारंपारिक पिकाकडून शेतकरी भाजीपाल्यामध्ये मोठ्या उतरले असून, भाजीपाला (vegitebal) शेतीला चांग़ले दिवस आले आहेत. यामध्ये विशेषत: टोमॅटो, वांगी आणि मिरचीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. विशेषत: सांगली, सोलापूर भागात टोमॅटो (Tomato) उत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमात वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसात टोमॅटोची उत्पादकता वाढत असताना मात्र टोमॅटोचे दर मात्र कमी होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला अपेक्षित दर मिळत असल्याने टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला जवळपास 50 रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र, आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या टोमॅटोला मात्र दहा रुपये प्रति किलो एवढा कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हेही वाचा : पीएम किसान योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ ?
वातावरणातील बदलांमुळे टोमॅटो उत्पादन काढणे मोठे जिकरीचे झाले आहे. टोमॅटोवर किडी-रोगांचा मोठा प्रदुर्भाव होत असताना मोठ्या कष्टांनी शेतकर्यांनी गुणवत्तापूर्ण टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यासाठी महागडी औषधे आणि खतांचा वापर केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मात्र दर अचानक गडगडल्याने टोमॅटोच्या पिकातून उत्पादन खर्च काढणेदेखील मुश्किल होत असल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो काढणी करण्याऐवजी टोमॅटो तसेच वावरात राहू दिले आहेत.
हे नक्की वाचा : खासबात ! यंदाही महाराष्ट्रात दमदार पाऊस; ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आले आहेत. शेतकऱ्यांना अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागतो. मात्र आता सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोचा उचित मोबदला मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना, अतिवृष्टी त्यानंतर बदललेल्या हवामानाचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा : आता टेस्ट ट्यूब द्वारे कालवडीचा जन्म
गेल्या वर्षी टोमॅटोला कवडीमोल दर मिळाला मात्र तरीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने यावर्षी टोमॅटोची लागवड केली. मात्र दर नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मते, टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा लाख रुपयापर्यंत उत्पादन खर्च आला आहे. मध्यंतरी हवामान बदलामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी त्यावेळी महागड्या औषधांची फवारणी केली म्हणून त्यांच्या पदरात टोमॅटोचे चांगले उत्पादन पडले मात्र आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली असल्याने चांगले उत्पादन प्राप्त करून देखील उत्पन्न मात्र कवडी मोलच राहणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇