पपईची मागणी वाढल्याने आता शेतकरी मोठ्या प्रमाणात पपई लागवडीकडे वळत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत देशातील पपई निर्यातीमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. तसेच निर्यातमूल्यामध्ये पण सुमारे दोन पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे पपई लागवडीचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.
पपईच्या पिकापासून कमी कालावधीत, कमी खर्चांत आणि कमी निगेत बर्यापैकी उत्पादन मिळते. आणि याच कारणाने देशात या पिकास कमी अवधीत अधिक लोकप्रियता मिळाली आहे. पपईच्या झाडापासून जवळजवळ वर्षभर फळे मिळतात. तसेच कमी अवधीत पीक येत असल्यामुळे इतर बागेतही पपई आंतरपीक म्हणून घेता येते. पपईच्या फळामध्ये अ, ब, आणि क, ही जीवनसत्वे तसेच अनेक अन्नघटकद्रव्ये असतात.

कच्च्या पपईच्या भाजीसाठी तसेच कोशिंबीरीत वापर करतात. पिकलेली घट्ट फळे अथवा काप, जॅम तयार औषधे तयार करण्यासाठी वापरतात. कच्च्या पपईपासून पेपेन नावाचा कच्चा चिकट द्राव काढतात. या पेपेनच्या उपयोग होतो. भारतात पपईचे सरासरी उत्पादन 8.5 टन आहे, तर महाराष्ट्रातील उत्पादन हेक्टरी 14.6 टन आहे. महाराष्ट्रात जळगाव, अहमदनगर, पुणे, धुळे, नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
लागवडीसाठी जमीन : पपईच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन चालते. पपईची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे मध्यम खोलीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली सकस जमीन या पिकास चांगली मानवते. चांगली मशागत करून आणि भरपूर सेंद्रिय खते घालून पपईचे पीक हलक्या जमिनीतही घेता येते. पपईच्या झाडांची मुळे ठिसूळ असल्यामुळे त्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनीत मुळे सडतात. पाने पिवळी पडून वाढ थांबते, उत्पादन घटते आणि कधी कधी झाडे मोडून पडतात. पाण्याचा चांगला निचरा न होणाचा भारी व चोपण जमिनीत तसेच क्षारयुक्त चुनखडीच्या व पाणी साचणार्या जमिनीत पपईची लागवड करू नये.
सुधारीत जाती : पपईच्या तैवान 786 (रेडलेडी), वाशिंग्टन, मधुबिंदु, सिलेक्शन-7 या जाती बर्याच वर्षांपासून प्रचलीत आहेत. तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमनुर यांनी को-1, को-2, को-7 या जाती प्रसारीत केल्या आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषेदच्या पुसा कृषी संशोधन केंद्रामार्फत पुसा डिलिशियस, पुसा मंजेस्टी, पुसा जायंट, पुसा डवार्फ, या जाती प्रसारीत करण्यात आल्या आहेत. अलीकडे तैवान जाती खुपच लोकप्रिय झाल्या आहेत.
हवामान आणि जमीन : पपई हे उष्ण प्रदेशातील पीक आहे. या पिकाच्या वाढीस उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव व धुके ह्या पिकास हानीकारक ठरतात. पपईची वाढ 38 ते 44 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. उबदार आणि समतोल उष्णतामान या पिकास योग्य समजले जाते.
पपईच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन चालते. पपईची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे मध्यम खोलीची पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली सकस जमीन या पिकास चांगली मानवते. चांगली मशागत करून आणि भरपूर सेंद्रिय खते घालून पपईचे पीक हलक्या जमिनीतही घेता येते.
पपईच्या झाडांची मुळे ठिसूळ असल्यामुळे या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही. अशा जमिनीत मुळे सडतात. पाने पिवळी पडून वाढ थांबते, उत्पादन घटते आणि कधी कधी झाडे मोडून पडतात. पाण्याचा चांगला निचरा न होणार्या भारी व चोपण जमिनीत तसेच क्षारयुक्त चुनखडीयुक्त व पाणी साचणार्या जमिनीत पपईची लागवड करू नये.
पपईची लागवड : पपईची लागवड वर्षातून तीन वेळा म्हणजे जून ते जुलै, सप्टेंबर ते ऑक्टोंबर आणि फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करता येते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि स्थनिक परिस्थितीनुसार हंगामाची निवड करावी. जून ते जुलैमध्ये अधिक पाऊस आणि भारी जमीन असलेल्या भागात जून ते जुलैची लागवड शक्यतो करू नये. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पुढे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये लागवड करावी.
पपईची लागवड करण्यासाठी शेतात 45 बाय 45 बाय 45 सें.मी. आकाराचे खड्डे 1.8 बाय 1.8 मीटर अंतरावर खोदावे. खड्ड्यात एक ते दोन किलो शेणखत टाकून त्यात उभयलिंगी पपईची रोपे लावावीत. सर्वसाधारण पपईला दोन महिन्यांनी एकदा खत दिले जाते. एका महिन्यानंतर प्रत्येक झाडाला 90 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 140 ग्रॅम पोटॅश द्यावे. पुढे खत देताना लिंबोळी खत तसेच शेणखताचा पण वापर करावा. अशा पद्धतीने प्रति एकरी 1200 झाडांची देखभाल करावी.
अंतरपीक : शेतात पहिल्या सहा महिन्यांमध्ये भाजीपाला लावावा. पपई मध्ये अंतरपीक घेतल्याचा दुहेरी फायदा होतो. विशेषत: तणांचे प्रमाण कमी होते; आणि आर्थिक फायदापण होतो.
खते व्यवस्थापन : पपईच्या झाडांची वाढ फुले येण्याची प्रक्रिया एकाच वेळी होत असते. पपई जलद वाढणारे आणि लवकर जास्त उत्पादन देणे झाड असल्यामुळे ते जमिनीतून जास्त अन्नद्रव्ये काढून हे पपईच्या खोडावरील प्रत्येक पानाच्या बगलेत फुल येते. ज्यापासून पुढे फळ मिळू शकते. यामुळे पपईच्या झाडाला वर्षभर अन्नद्रव्याची आवश्यकता भासते. पपईला लागवडीच्या वेळी भरपूर शेणखत द्यावे. याशिवाय प्रत्येक आळ्यात 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद, 50 ग्रॅम पालाश अशा खतमात्रा 1, 3, 5 आणि सहा महिन्यांनी प्रत्येकी वेळी द्यावी. म्हणजेच एकूण 200 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रत्येक झाडाला द्यावे. जमीन हलकी असलेल्या बागेत हे प्रमाण 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ते 500 ग्रॅम पालाश चार ते सहा वेळा सारख्या प्रमाणात विभागून दोन ते दोन महिन्याच्या अंतराने द्यावे. खाते झाडापासून 12 ते 15 सेंमी (अर्धा फुट) अंतरावर झाडाभोवती 10 सें.मी. गोलाकार थर खोदून त्यात टाकून मातीने झाकावीत, नंतर लगेच पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन : पपई पिकाचे उत्पादन तसेच दर्जा बहुतांशी या पिकास दिल्या जाणार्या खतांच्या मात्रेवर अवलंबून असतो. म्हणून सेंद्रिय खतासोबत रासायनिक तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते या पिकाची गरज लक्षात घेऊन देणे गरजेचे आहे. पपईचे झाड जलद वाढणारे, वर्षभर फुले व फळे देणारे व फळांचे उत्पादनही अधिक देणारे असल्यामुळे या पिकास खताच्या भरपूर मात्रा हप्त्यामध्ये विभागून द्याव्यात.
रोपे एक महिन्याची असताना सुफला 15:15:15 चा पहिला हप्ता प्रतिरोप 50 ग्रॅम, रोपे दोन महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा दुसरा हप्ता प्रतिरोप 100 ग्रॅम, रोपे तीन महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा तिसरा हप्ता प्रतिरोप 200 ग्रॅम, रोपे चार महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा चौथा हप्ता प्रतिरोप 300 ग्रॅम, रोपे पाच महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा पाचवा हप्ता प्रतिरोप 400 ग्रॅम, रोपे सहाव्या महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा सहा हप्ता प्रतिरोप 500 ग्रॅम, रोपे सात महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा सातवा हप्ता प्रतिरोप 600 ग्रॅम, रोपे आठ महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा आठवा हप्ता प्रतिरोप 700 ग्रॅम, व रोपे नऊ महिन्याची झाल्यानंतर सुफला 15:15:15 चा नववा हप्ता प्रतिरोप 800 ग्रॅम अशा पद्धतीने शक्यतो कंपोस्ट अथवा शेणखतात मिसळून द्यावा. विशेषत: खते रिंग किंवा रांगोळी पद्धतीने देणे गरजेचे आहे.
पाणी व्यवस्थापन : झाडांना वेळेवर तसेच पुरेसे पाणी पुरवठा करून फळांची वाढ चांगली होते. उत्तम निचर्याच्या जमिनीत पिकाच्या वाढीच्या काळात सात ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळ्यात चार महिन्यातून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. हिवाळ्यात तीन पाळ्या देणे आवश्यक आहे. बुंध्याला पाणी लागले तर तो सडण्याचा संभव असतो. या रोगास कॉलररॉट असे म्हणतात. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. उदा. बाग तणविरहित राहते. सुफला 19:19:19 सारख्या 100 टक्के पाण्यात विरघळणार्या खताचा उपयोग करता येतो. पाणी बुध्यापासून लांब देता येते. त्यामुळे कॉलर रॉटचा प्रादुर्भाव होत नाही. यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
बागेत अथवा झाडाच्या बुंध्याची पाणी साचून राहणे पपईच्या पिकाला धोकादायक ठरते. जास्त पाण्यामुळे झाडाचा बुंधा सडून झाडे कोलमडतात, याउलट पाण्याचा ताण पडल्यास फळांचे पोषण व्यवस्थित होत नाही. म्हणून पपईला नियमीत आणि आटोपशीर पाणी द्यावे. पपईला पाणी देताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.
बागेला वारंवार आणि प्रमाणाबाहेर पाणी देऊ नये. खताच्या प्रत्येक हान्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडणार नाही इतके अंतर पाण्याच्या दोन पाळ्यांत ठेवावे.
बुंध्याचा पाण्याशी संबंध येऊ नये ह्यासाठी बुंध्याभोवती उंच मातीची भर घालावी आणि उतार काढावा. पावसाच्या जरूरीनुसार, हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी आणि चार ते चार दिवसांनी पाणी द्यावे. बागेत पावसाचे पाणी साचू नये म्हणून पावसाळ्यात काढून द्यावेत.
आंतरपिके आंतरमशागत आणि तणनियंत्रण : पपईची मुळे उथळ असतात. त्यामुळे आंतरमशागत व खुरपणी फक्त तण काढण्यासाठी वरवर करून बाग स्वच्छ ठेवावी. पपईमध्ये शक्यतो आंतरपिक घेऊ नये. आंतरपिक घ्यायचे असल्यास सुरूवातीच्या सहा ते आठ महिन्यांच्या काळात मूग, उडीद, चवळी, वाटाणा, घेवडा, कांदा, मुळा यांसारखी पिके घ्यावीत. वेलभाज्या कोबीवर्गीय भाज्या, भेंडी, वांगी, यासारखी भाजीपाला पिके आणि उंच वाढणारी ज्वारी, मका, कापूस ही पिके आंतरपिके म्हणून घेऊ नयेत. वेलवर्गीय भाज्या आणि वांगी ही पिके पपईच्या जवळ लावू नयेत. आंतरपिकांना खताच्या वेगळ्या मात्रा द्याव्यात.
पपईच्या झाडाची मुळे उथळ वाढतात. त्यामुळे तण वाढू देऊ नये. वेळीवेळी खुरपणी करून तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. सुरूवातीच्या काळात योग्य आंतरपिके घेतल्यास तणांची वाढ थांबते. पपईच्या बागेत वर्षांतून दोन ते तीन वेळा निंदणी किंवा हलकी खुरपणी करावी. मात्र 12 ते 15 सें.मी. पेक्षा जास्त खोल निंदणी किंवा खुरपणी करू नये.
फळांची काढणी उत्पादन आणि विक्री : पपईचे रोप लावल्यानंतर चार ते सहा महिन्यांनी पपईच्या झाडाला फुले येतात आणि फळधारणा झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी फळे काढणीस तयार होतात. म्हणजेच रोपे लावल्यापासून एका वर्षांत फळे काढणीस येतात. फळ तयार झाले हे खालील गुणधर्मावरून ओळखावे.
फळावर पिवळट भाग दिसू लागतो. फळाच्या सालीला नखाने खरडल्यास सालीतून दुधासारखा चीक न नीघता पाण्यासारख्या चीक निघतो. फळाच्या देठाजवळच्या भाग पिवळा दिसू लागतो. हे बदल दिसल्यानंतर फळे टोकाला धरून हळूवारपणे पिवळट देठासह काढावीत. लांबच्या बाजारपेठेसाठी पूर्ण वाढलेली परंतु फिक्कट हिरवी व कडक फळे काढावीत. फळांवर कागद गुंडाळून टोपल्यात खालीवर गवताच्या थर द्यावा. टोपलीवर झाकण लावून सुतळीने बांधुन नंतर टोपल्या विक्रीसाठी पाठवाव्यात.
पपईचे झाड साधारणत: दोन वर्षांपर्यंत भरपूर फळ देते त्यानंतर मात्र उत्पादन कमी होते. साधारपणे पपईच्या एका झाडापासून प्रत्येक वर्षांला 25 ते 30 फळे मिळतात. फळाचे वजन 500 ग्रॅम ते 3 किलोपर्यंत असते. म्हणजे सरासरी दर हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन दर वर्षी मिळू शकते.
फळांची साठवण : पपईचे फळ काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाही. फळ काळजीपूर्वक हाताळणे लागते. खरचटल्यामुळे किंवा वजनामुळे फळे लवकर खराब होतात, म्हणूनच बहुतेक वेळा फळे एका थरातच पॅक करून दूरच्या बाजारात पाठवितात. फळांच्या आजूबाजूला कागदाचे तुकडे यांसारख्या गुंडाळून ठेवणे.
भारतातून पपईची फळे फार मोठ्या प्रमाणावर निर्यात होत नाहीत. हवाई देशातून पपईची फळे निर्यात होण्याअगोदर धुरी किंवा व्हेपर हिट देऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. यादोन पद्धतीपैकी धुरी देण्याची पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. धुरी देण्यापूर्वी फळे 50 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात 20 मिनीटे धरातीत. फळांना धुरी देण्यासाठी ईथिलीन डायब्रोमहिनचा वापर करतात. फळे 23 अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे पिकतात. 12 अंश सेल्सिअस तापमानात फळे दोन आठवड्यापर्यंत ठेवता येतात.
पेपेन उद्योग : पपईमध्ये पेपेन नावाचे डुन्झाईन असते, त्यापासून पेपेन तयार करता येते. पपईच्या कच्च्या फळातून जो ब्लक निघतो, त्यात घटक असतो. पेपेनचा उपयोग खाद्यपदार्थात आणि औषधीनिर्मितीत केला जातो. पेपेनसाठी को-2, ही पपई जात चांगली समजली जाते. पूर्ण वाढलेला हिरव्या रंगाच्या 70 ते 70 दिवसांच्या पपया चीक काढण्यासाठी वापराव्यात. साधारणपणे एक महिनाभर हे काम चालत तीन ते चार दिवसांनी त्याच फळावर स्टील चाकूने चर्या पाडून चीक गोळा करावा. चीक काढण्याचे काम सकाळी करावे. ताज्या चिकात दर 100 किलोसाठी अर्धा किलो सोडियम मेटॉबाय सल्फाईड मिसळावे. म्हणजे चीक खराब होत नाही. एका झाडापासून सुमारे पाऊण किलो चीक मिळतो एक हेक्टर लागवडीपासून सुमारे एक टन चिकाचे उत्पादन मिळते. चीक काढलेली फळे पुढे पिकवून खाण्यासाठी वापरता येतात. विक्रीकरिता पाठविता येतात. काढलेला चीक सुरक्षितपणे पुढील प्रक्रियेसाठी लगेच पाठवावा.
डॉ. पल्लवी दीपक घोडके सहाय्यक प्राध्यापिका, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र, कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु, ता. कराड, जि. सातारा. मोबा. 8552016373